मैं योगेश जाधव (उच्च माध्यमिक शिक्षक, लेखक, कवि) अपने वेबपेज DNYAN SAGAR में आपका स्वागत करता हूं|

पैसा - एक वैचारिक सत्य

                                                                पैसा 

                    मानवी जीवनात पैशाला इतके महत्व दिले जाते की, पैसा हेच माणसाचे सर्वस्व होऊन बसले आहे. असे घडण्याचे प्रमुख कारण म्हणजे की पैशांच्या बळावर माणसाला सर्व काही विकत घेता येते.इतकेच नाही तर माणसाला सुध्दा विकत घेण्याचे सामर्थ्य पैशात आहे. पैशासाठी माणसे अक्षरशः पिसी (वेडी ) होतात आणि त्यापायी ते स्वतःला जीवनात हरपून बसतात. पैसा हे साधन आहे साध्य नाही ही महत्वाची गोष्ट विसरल्यामुळेच सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात. पैशासाठी मर-मर मारणाऱ्या माणसांसाठी पैशाने मिळणाऱ्या संपत्तीचा उपयोग घ्यावयास मरेपर्यंत वेळच मिळत नाही. त्यांनी मिळविलेला पैसा मात्र इतरांच्या कमी येतो. व प्रत्येक्षात ती माणसे पैशांचा दुरुरुपयोग करून कामातून जातात. थोड्याच पैशांचा हव्यास सर्वांचा नाशास कारणीभूत ठरत असतो. 

पैशांविषयी काही महत्वाचे :

*जीवनात पैसे अत्यंत आवश्यक आहे हे खरे, परंतु त्याची मर्यादा ओळखणे बरे.

*खर्या अर्थाने तोच श्रीमंत जो पूर्ण झाला निरासक्त.

*Money is something but not everything.

*पैशांची कमाई संसार सुखाचा करण्यास आवश्यक आहे. त्याहुन अधिक महत्वाची आहे पुण्याची कमाई.

*पैसा ही लक्ष्मी नसून शांती ही खरी लक्ष्मी आहे.

*सुखसोयी प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य पैशात आहे परंतु, सुखशांती प्राप्त करून देण्यात पैसा असमर्थ ठरतो.

*"जीवनात पैसा जितका आवश्यक आहे तितके पुण्यही आवश्यक असते." या सत्याची जाणीव मानव जातीला जेव्हा होईल, तेव्हाच विश्वात खरी क्रांती घडेल.

*पैसा हा देव आहे जर त्याची सदुपयोग केला तर, पैसा हा दैत्य आहे. जर त्याचा दुरुपयोग झाला तर.

*पैसा सर्वस्व आहे असे माणसांना जो पर्यंत वाटत राहील तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने सर्वस्वाला मुकत राहतील, हे निश्चित.

*संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंज चढवते. गांजा- अफू, दारू- गर्द, अश्या अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते. आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन सोडते/ पोहचविते.

*अनिष्ट व भ्रष्ट मार्गांनी मिळविलेल्या शापित पैसा तो मिळविणार्यांना तापदायक ठरतो. पण तो पैसा त्यांच्या मुलाबाळांना व पुढील पिढीला वारसा हक्काने व निसर्ग नियमानुसार अत्यंत कुशकारक , दुःखदायक व हानिकारक ठरतो. 

*"पैसा हाच देव व संपत्ती हीच लक्ष्मी", असे माणसाला जो पर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसांतील माणुसकी निर्माण होणार नाही. व मानव जातीला अपेक्षित अशी असलेली सुख-शांती-समाधान कधीच प्राप्त होणार नाही.

                  वरील लेखाविषयी आपले मत खालील कमेंट्स बॉक्स मध्ये जरूर कळवा. व अशाच नवीन विषयाला समजून घेण्यासाठी ब्लॉगला फॉलो करा.

                                                   धन्यवाद !

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा