मैं योगेश जाधव (उच्च माध्यमिक शिक्षक, लेखक, कवि) अपने वेबपेज DNYAN SAGAR में आपका स्वागत करता हूं|

धर्माचे मर्म

   * धर्म :

    

         मानव जातीच्या कल्याणासाठी धर्म ही संकल्पना मुळात निर्माण झाली. अखिल मानव जातीला सुख शांती समाधान प्राप्त करून देण्यासाठी धर्माचे प्रयोजन असते. प्रत्यक्षात मात्र नेमकी उलट परिस्थिती असल्याचे दिसून येते. धर्माच्या नावाखाली अधर्म माजलेला असून धर्माध झालेले धर्मवेडे जगात सर्वत्र तंटे-बखेडे, दंगे- धोपे, युद्ध -लढाया करून मोठ्या प्रमाणावर रक्तपात घडवून आणीत असतात. धर्म कशाशी खातात ? हे जेथे धर्ममार्तंडांना कळत नाही तेथे त्यांच्या अज्ञानी अनुयायांना कसे कळणार ? लोकांच्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा घेऊन धर्माध धर्ममार्तंड व स्वार्थ राजकीय पुढारी स्वतःच्या पोळीवर मात्र तूप ओढून घेतात ही मोठी खेदाची गोष्ट होय.

*The essence of Religion is Wisdom.

* परमेश्वराचे निसर्गनियम व त्यांचे मानवी जीवनावर होणारे बरेवाईट परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेले विचार धारणा म्हणजे धर्म.

* अखिल मानवजातीसाठी धर्म एकच असतो. ज्याप्रमाणे समुद्र अखिल मानवजातीसाठी एकच आहे त्याप्रमाणे हा धर्म म्हणजे जीवन धर्म.

* 'माणसांतील माणुसकी जागृत करणे' हाच खरा धर्म, हेच आहे खरे शिक्षण, व तोच आहे मानवजातीच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय.

* समाजाचे माणसावर असलेले गुण लक्षात घेऊन माणसाने माणसांबरोबर माणसांसारखे वागणे हाच माणसांचा स्वधर्म आहे.

* जो धर्म इतर धर्मियांवर अन्याय व अत्याचार करण्यास शिकवितो किंवा प्रोत्साहन देतो तो धर्म हा खरा धर्म नसून साक्षात अधर्म होईल.

*Body without life is useless, religion without wisdom is worthless and life without wisdom is hopeless.

* "तुम्ही सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू द्या" या धारणेला खरा धर्म असे म्हणतात.

* धर्माच्या नावाखाली माणसांनी रक्तपात घडवून आणणे हे मानव जातीला कलंक फासणारी गोष्ट आहे.

* कुठल्याही कारणास्तव धर्मवेड्या धर्माध लोकांचे अनिष्ट उपदव्याप खपवून घेणे राष्ट्राला धोकादायक आहे.

* राष्ट्र धर्म हाच देशाचा एकमेव धर्म असून बाकीचे सर्व प्रचलित धर्म हे धर्म नसून संप्रदाय होत.

* जगातील सर्व धर्मांचे सर्व लोक देव धर्माच्या नावाखाली खूप काही करीत असतात; पण प्रत्यक्षात मात्र ते जे काही करतात त्या कर्मकांडात देवही नसतो व धर्म नसतो.

* परमेश्वर धर्म व परमार्थ यासंबंधी लोकांच्या कल्पना अगदी उथळ व निर्बुद्ध असतात.

* "दुसर्‍यांच्या दुःखाने दुःखी होणे व इतरांच्या सुखाने सुखी होणे" हा खरा धर्म असून विश्वशांतीचा खरा मार्ग तोच आहे.

* सामान्य माणसाला धर्म म्हणजे काय हेच मुळात नीट समजत नाही व त्यामुळेच निधर्मी राज्याला अधर्मी राज्याचे स्वरूप प्राप्त झाले नाही तरच नवल.

* समाजकंटकांचे संपूर्ण निर्णय निर्दळण, हाच धर्म, तीच दया व अहिंसा तीच.

* वैदिक धर्मात संध्येला जे महत्त्व आहे तेच भागवत धर्मात हरिपाठाला आहे.

* माणसाने निर्माण केलेल्या परमेश्वराच्या पाषाणाच्या मूर्तिपूजेत गुंतून न राहता, विश्वातील प्रत्येक माणूस हीच साक्षात परमेश्वराने निर्माण केलेले परमेश्वराचे जिवंत मूर्ती आहे. या सत्याची जाणीव ठेवून जीवन जगण्यात खरी मूर्तिपूजा व खरा धर्म असून त्यात मानव जातीचे कल्याण आहे. शिवाय मानवजातीच्या सर्व समस्या सोडवण्याचे सामर्थ्य सुद्धा त्यातच आहे.

* अखिल मानवजातीसाठी धर्म एकच आहे, व तो म्हणजे जीवन धर्म असून प्रचलित असलेले सर्व धर्म हे प्रत्यक्षात धर्म नसून संप्रदाय होत.

* आपला धर्म श्रेष्ठ व इतरांचा धर्म कनिष्ठ असे ज्यांना वाटते ते एका बाजूने हा अधर्म करण्याचे महापाप करतात व दुसर्‍या बाजूने त्यांचे धर्माबद्दल विज्ञान प्रदर्शन करीत असतात.

* 'माणसांनी माणसांबरोबर माणसांसारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे' हेच आहे देवाचे भजन- पूजन, तीच आहे देवाची भक्ती- उपासना आणि तोच आहे खरा धर्म.

* 'माणसातील माणुसकी जागृत करणे' हाच आहे खरा धर्म. तेच आहे खरे शिक्षण व तोच आहे मानव जातीच्या सर्व समस्यांवरील प्रभावी उपाय.

* प्रचलित सर्व धर्मांचे एक गाठोडे तयार करून ते समुद्रात बुडविले तरी मानवजातीचे काडीचेही नुकसान होणार नाही. उलट ती आज आहे त्यापेक्षा सहस्त्र पटीने अधिक सुख शांती समाधान प्राप्त करून देईल;

* 'धर्मासाठी मानव नसून मानवासाठी धर्म आहे' हे सर्वच माणसांना कळेनासे झाले ही मोठी खेदाची गोष्ट आहे.

* खरा धर्म एकच असतो, पण भावनांचा अविष्कार करण्याच्या पद्धती व रितीरिवाज वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या अपेक्षेत एकाच धर्माला निरनिराळी नावे पडली गेली, व जगातील विविध धर्म बोकाळले गेले.

* धर्माचा प्रसार करणे याचा खरा अर्थ माणसांची नीती व उन्नती घडवून आणून त्यांच्यातील माणुसकी जागृत करण्याऱ्या धर्माच्या उच्च तत्त्वांचा प्रसार करणे हा होय, त्यासाठी धर्मांतर हा प्रकार अर्थशून्य आहे.

* माणुसकी साकार करण्यासाठी धर्माचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे या व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकार यामुळे माणसातील पशुत्व साकार होऊन मानवी जीवन असह्य व दुःखाचे होते ते केवळ अधर्म होईल.

* तोच धर्म खरा जो निसर्गाच्या त्रिकालाबाधित सिद्धांताशी सुसंगत आहे व जे धर्म निसर्गाच्या त्रिकालाबाधित सिद्धांताशी विसंगत आहे ते धर्म या नावाला पात्रच असू शकत नाहीत.


             वरील वृतांत वाचून खऱ्या धर्माची आपणास जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे. या लेखावरील आपले मतमतांतरे अवश्य कळवा. व नवीन अशाच वैचारिक पोस्ट साठी ब्लोगवर मला फॉलो करा.

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा