मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

अध्याच्या निवडणुका घटनेवर की धर्मावर आधारित

          नमस्कार मित्रहो, आपला देश लोकशाही पध्दतीने चालतो. लोकशाही म्हणजे "लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेली शासन पध्दती होय." जेथे लोकांच्या मतांनी प्रतिनिधी निवडून शासन कारभार चालतो. जी जनता प्रतिनिधी निवडून देते तीच जनता प्रतिनिधीने विश्वासघात केल्यास अथवा सत्तेचा दुरुपयोग केल्यास सत्तेवरून दूर करू शकते. अशा देशात आपण राहतो. ही शासन पध्दती घटनेत नमूद आहे परंतु सध्याचे राजकारण पहिले तर ते एक तर जातीच्या आधारे अथवा धर्माच्या आधारे होतांना दिसत आहे.

      आपल्या राज्य घटनेनुसार देश कोणत्याही एकाच धर्माला अथवा जातीला प्राधान्य देणार नाही. सर्व धर्म समभाव बाळगला जाईल. कोणताही धर्म श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. असे नमूद करण्यात आले होते. तरीदेखील अनेक समाज माध्यमांद्वारे धर्माच्या व जातीच्या आधारे मते गोळा केली जातात. येथील जनतेला अंधारात ठेवून खरे वास्तव कोणी समोर आणून राजकारण करत नाही. नेहमी लोकांना हे भासवले जाते की तुमचा धर्म धोक्यात आहे. तुमच्या जातिला धोका आहे. तुम्ही असे करा. तसे करा. असे भडकावले जाते. ज्या सर्व सामान्य जनतेला बाकी काही घेणे देणे नसते त्याच्या डोक्यात किडे भरण्याचे व त्याला पेटवून बाजूने गंमत पाह्ण्याचे अगदी खालच्या दर्जाचे राजकारण केले जात आहे. 

आग आपण लावायची आणि पुन्हा ती विझवण्याचे नाटक सुद्धा आपणच करायचे. असे घाणेरडे राजकारण केल्यामुळे देशाच्या प्रगतीत बाधा निर्माण होत आहे. जे स्वतः १० पास झाले नाहीत व्यवस्थित. तिथे सुद्धा वशिला कमी आला ते आज तुमच्यावर राज्य करता आहेत. नव्हे तर आपल्या खुर्च्या शाबूत राखण्यासाठी सार्वजनिक संपत्ती पणाला लावत आहेत. स्वतः करोडपती होऊन देशाला फुकटची सवय लावून रोडपती बनवत आहेत. जनतेला फुकट खाण्याच्या सवयी लावण्यापेक्षा ते विकत घेण्यासाठी कामाची व्यवस्था / रोजगार उभा करून दिल्यास ते स्वाभिमानी बनतील. आणि पुन्हा कधीही त्यांना भिकेचे डोहाळे लागणार नाहीत असे मला वाटते. 

        कोणताही धर्म धोक्यात नाही. कोणतीही जात धोक्यात नाही. धोक्यात आहेत त्या फक्त राजकारण्यांच्या खुर्च्या ! म्हणून देशाचा व आपला विकास जर करायचा असेल तर आपले मत विकण्यापेक्षा ते सत्कारणी कसे लावता येईल याचा विचार व्हायला हवा. हजार -दोन हजार तुमच्या आयुष्याला पुरणार नाहीत. पण एक चुकीचा राजनेता तुमची व तुमच्या देशाची वाट लावू शकतो. भारत सर्व धर्म व जाती सामावून घेणारा विविध्तेते एकता जोपासणारा देश आहे. ही ओळख कायम ठेवा. आणि सर्व अंतर्गत मतभेद विसरून एकात्मतेचा संदेश अखंडपणे जगाला देत राहा एवढीच विनंती. देश आपला आहे. आपण देशाचे आहोत. ही भावना नेहमी हृदयात जपायला हवी. राजधर्म पेक्षा श्रेष्ठ धर्म नाही. धन्यवाद !

लेखन - योगेश जाधव 

शिक्षक, लेखक, कवी, ब्लॉग राईटर, यूट्यूबर

www.yogeshjadhave.com

हे पण वाचा :
Home page  : click here 

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 

Follow on google news : click here 


Whatsapp channel : click here


Follow on twitter : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा